बंड झालं त्यावेळी राजन साळवी देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कोकणात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
टीम तालुका न्यूज / 14-Apr-2023
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे तब्बल 40 आमदार फुटले. यात कोकणातील आमदारांची संख्या मोठी होती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जोता. परंतु बहुतांश आमदार शिंदे गटात गेले. त्यात उदय सामंत यांचाही समावेश आहे. बंड झालं त्यावेळी राजन साळवी देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत.
शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उदय सामंत यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. पण, साळवी यांनी मात्र अद्याप रत्नागिरीमधून लढण्याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कोकणात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
सध्या विविध चर्चा रंगताना दिसून येत आहेत. साऱ्या शक्यतांचा, राजकीय गणिताचा विचार केल्यास शिवाय राजन साळवी यांची रत्नागिरी येथील ताकद पाहिल्यास साळवी सामंतांसमोर तगडा आव्हान उभं करु शकतात. त्यामुळे सध्या ठाकरे गट उदय सामंत यांच्यासमोर साळवी यांचं आव्हान उभे करण्याच्या प्रयत्न असल्याची चर्चा सुरु झालेली आहे.
राजन साळवी हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी राजन साळवी यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांची असलेली फौज आणि दांडगा जनसंपर्क या राजन साळवी यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे राजन साळवी हे उदय सामंत यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करु शकतात, असं मानणारा देखील एक मोठा वर्ग आहे.
दुसरीकडे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हेदेखली रत्नागिरीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षाने सांगितल्यास रत्नागिरीतून लढेन अशी प्रतिक्रीया भास्कर जाधव यांनी दिली होती. याशिवाय, भास्कर जाधव यांचा मुलगा आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधवला गुहागरमध्ये उमेदवारी मिळू शकते, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले होते.
उदय सामंत यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पण, साळवी यांनी मात्र अद्याप रत्नागिरीमधून लढण्याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही.