राहुल गांधी यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यात बैठक पार पाडली. त्यानंतर यावेळी माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, मला आनंद आहे की शरद पवार मुंबईहून भेटण्यासाठी आले आणि मार्गदर्शन केलं. काल राहुल गांधी यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आमचं हेच मत आहे की, सगळ्यांना भेटून, बोलून, एकत्र येऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या हितासाठी सगळ्यांना भेटणं गरजेचं आहे.
सावरकरांचा मुद्दा, सूरत कोर्टाने सुनावलेली शिक्षा आणि त्या शिक्षेनंतर राहुल गांधीचे सदसत्व रद्द अशा एक ना अनेक कारणांनी राहुल गांधी चर्चेत राहिले. पण या सर्वांत अडचण निर्माण झाली ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. कारण गांधींची सावरकरांच्या विरोधातली भूमिका ही ठाकरेंना पटलेली नाही. हिच भूमिका गांधींना तर अडचणीत आणणारी ठरलीच पण त्याचबरोबर ठाकरेंनाही अडचणीत आणलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याची माहिती आहे. या भेटीसाठी स्वतः राहुल गांधी मुंबईत येणार असून ‘मातोश्री’ बंगल्यावर ही भेट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गांधी-ठाकरे यांच्या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरीही या भेटीतून वीर सावरकर वादानंतर एक प्रकारे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचही बोललं जातं आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान हे मातोश्रीवर आले होते. या भेटीने देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला.सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे अनेक दिग्गज नेते मातोश्रीवर येऊन गेले आहेत. या भेटीने देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला.