श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाचे आयोजन
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. राज्यात आता सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार असून त्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सत्तासंघर्षावरील निकाल पुढील १० दिवसात येण्याची शक्यता आहे. या सर्वाोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात वकीलांना मारहाण होण्याच्या घटना वाढत असून त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात "महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा" आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी.